Followers

Thursday, November 26, 2009

मुम्बई स्पिरिट


३१ करोड रुपये..., ३६५ दिवसात , दळभद्री, नपुंसक, निष्क्रिय, भारत सरकारने तुमच्या आमच्या कष्टाच्या कमाईवर "कर" या गोन्डस नावाने डल्ला मारुन जमा करुन, एका क्रुर, निर्दयी कसायावर खर्च केलेल्या पैशाचा हा आकडा आहे..... २६ नोव्हेम्बर २००८ च्या काळरात्रीला आज बरोबर एक वर्ष पुर्ण होत आहे. ते आले, त्यानी मृत्युचा नंगा नाच केला. आणि स्वत:सुद्धा मरून गेले. २६ नोव्हेम्बर ने अनेकाची आयुष्ये कायमची बदलून टाकली आहेत.

दहशतवाद 'मुम्बई स्पिरिट' ला धक्का लावू शकत नाही, असा कान्गावा जर कोण करत असेल तर तो पोकळ आहे. जखम जर भळ्भळती असेल तर ती लपवता येत नाही. दहशतवाद्यानी मुम्बई ला जबर जखमी केलय खर पण हे युद्ध मुम्बईकरानी केव्हाच मान्य केलय किम्बहूना ते त्याला तोन्ड द्यायला कंबर कसून तय्यार असतात. मग ते मार्च १९९३ असो, की ७/११.... ते हल्ला करतात आणि मुम्बईकर त्याना आपल्या कृती ने नेस्तनाबूत करतात.

...पण या वेळी मात्र हेच आमच "स्पिरिट" थोड ढासळतय. ...... नाही...दहशतवाद्याना आम्ही घाबरलो नाहिये ते अम्हाला घाबरवू शकत नाहीच मूळी. आम्ही घाबरलोय ते २६/११ नंतर जो सरकारी दहशतवाद सुरू आहे त्याला. गोळ्यान्चा वर्षाव अन्गावर झेलून ज्या अतिरेक्याला आमच्या बहादूर पोलिसानी पकडले ते काय त्याच्यावर ३५ करोड रुपये खर्च करण्या साठी? या ३५ करोड रुपया मधे किती पोलिसान्च्या वसाहती बान्धता आल्या असत्या? किन्वा किती पोलिसाना शस्त्र किन्वा संरक्षण कवच पुरवता आली असती ? ज्या अतिरेक्याने मृत्युचा नंगा नाच केला त्याच्यावर पैसा खर्च करणार्‍या सरकारच डोक ठिकाणावर नक्किच नाही.

आमचे "मुम्बई स्पिरिट" ढासळतय ते दहशदवाद्यान्च्या अतिरेकाने नाही तर ते या नपुंसक, निष्क्रिय सरकारच्या निष्क्रियतेच्या अतिरेकाने. मनात विचार येतो दहशतवादी कोण ? जे अचानक येऊन अंधाधुन्द गोळ्या चालवून क्षणात शेकडो लोकाना मारतात ते ? की आपल्या निष्क्रियतेच्या कळसाने लोकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण करून लोकाना क्षणोक्षणी मारतं ते सरकार? की मग.. चवताळून उठून सरकारला जाब विचारण्या ऐवजी मेणबत्त्या लावून "चमकोगिरि" करत निषेध व्यक्त करणारं ढोन्गी,वान्झोटं आणि मुर्दाड "मुम्बई स्पिरीट"

2 comments:

सिद्धार्थ said...

मेणबत्त्या लावून "चमकोगिरि" करत निषेध व्यक्त करणारं ढोन्गी,वान्झोटं आणि मुर्दाड नुसतचं "मुम्बई" नव्हे तर "भारतीय स्पिरीट"

किमंतु said...

Masta aahe! Awadala ha lekh!!!