Followers

Saturday, November 7, 2009

बाळासाहेब, टक्कल अस्वलालापण पडतं म्हटल.


कालच बाळासाहेब म्हणाले, शिवसेना अस्वला सारखी आहे. काही केस गळून पडले तर शिवसेनेला फ़रक पडणार नाही. आता केस गळून पडलेले हे शिवसेना रुपी अस्वल नक्की कस दिसेल हा एक विचार मनाला चाटून गेला. आणि तेवढ्यात हे चित्र माझ्या डोळ्या समोर आले. या छायाचित्रा चा जो कोणी छायाचित्रकार असेल त्याच मी मना पासून आभारी आहे बुआ. मा. बाळासाहेबाना सत्याची जाणीव करुन देण्यास हे चित्र पुरेसे आहे...
बाळासाहेब
, खुप उशीर झाला आहे, पण.... अजुनही हातातुन वेळ मात्र गेलेली नाही. या अस्वलाच्या अंगावर पून्हा केस उगवलेले पाहण्यास आम्ही आतूर आहोत, तशी आमची मनोमन इच्छा सुद्धा आहे. तूटलेल मराठी मन, तुम्ही प्रयत्न केलात तर पून्हा एकसंघ होईल. तस होण गरजेच आहे. नाहीतर आपला लोण्याच्या गोळ्यावर ही माकडे ताव मारतील. आणि आपल्याच राज्यात आपण भुकेले राहू. महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले ही तर संत वाणी आहे. महाराष्ट्रातील मराठी हिन्दुना देशोधडीला लावून हिन्दुस्थानाच्या तमाम हिन्दुन्चे भले साधणार तरी कसे ?

..आणि त्यातुनही जरी हिन्दुत्वाच्या भल्या साठी एक वेळ आम्ही 'मराठी' चा मुद्दा बाजूला ठेवला तरी, जो इथल्या हिन्दून्च भलं नाही करु शकला तो हिन्दूस्थानातील तमाम हिन्दून्चे भले ते काय करणार. असा प्रश्न किन्वा शंका आमच्या मनात आल्यास ते गैर आहे काय? तेव्हा साहेब, आजूबाजू चे बडवे काय म्हणताहेत या पेक्षा तुम्ही काय म्हणाल त्याला मराठी माणूस किम्मत देतो हे विसरु नका. 'मराठी माणसाने पाठीत खंजीर खुपसला' अस विधान बाळासाहेब करुच शकत नाहीत, हा जो विश्वास तुमच्यावर आहे तसा विश्वास जनता कोणत्याही नेत्यावर दाखवत नाही. तुमच्या जवळ हा जनतेच्या विश्वासाचा खजीना आहे. त्याचा पुरेपूर वापर करा. या महाराष्ट्राचा , मराठीचा होणारा र्‍हास दूहीने थाम्बणार नाही. तेव्हा अजुनही तुटलेली मने सान्धण्याची. वेळ गेलेली नाहिये. ... या अस्वलाचे गेलेले केस फ़क्त तुम्हीच परत आणू शकता.... नाहीतर केसान्चे काय आहे....ते अस्वलाचे काय माणसाचे काय निगा नाही राखली तर ते जाणारच.....

Friday, November 6, 2009

पाठित खुपसलेल्या खंजीराची गोष्ट.

ज्या मराठी माणसाने शिवसेनेच्या पाठित खंजीर खुपसल्याची भाषा बाळासाहेब करत आहेत, त्या मराठी माणसाने तस का केल याच आत्मपरिक्षण करण्याचे कष्ट त्यानी घेतल्याचे दिसत नाहित. पराभव झाल्या बरोबर उलट-सुलट शब्दाचे वार मराठी माणसावर करण्याचे सत्र शिवसेनेने आरंभले आहे. (अर्थात, बाळासाहेबान्चा बोलविता धनी कोणी तरी दुसराच आहे हे १००% नक्की कारण बाळासाहेबानसारखा एक माच्युअर नेता आपल्या मायबाप मतदाराना उद्देशून असे बालीश विधान कधिहि करणार नाही हे त्रिवार सत्य आहे.) पण तस करताना त्यानी मराठी माणसाला काय आपल्या गोठ्यात बान्धलेली गाय समजले आहेत काय? किन्वा जेव्हा 'मराठी माणुस' ही आपली 'व्होट बान्क' मानून चाललेल्या शिवसेनेला आपली ही बान्क शाबुत ठेवण्या साठी काहीही प्रयत्न करावेशे वाटले नाहीत काय? कि शिवसेनेने मराठी माणसाला इतका गृहीत धरला काय कि त्याला स्वत:ची निवड करण्याचा अधिकारच नाही ? असे का? गेल्या १० वर्षात शिवसेनेने मराठी माणसासाठी अस काय भरीव काम केल की त्याची पोच-पावती म्हणून मराठी माणसाने त्याना मते द्यावीत ? गेल्या १० वर्षात मराठी माणसाची सर्वतोपरी पीछेहाट होत असताना शिवसेना काहीच करताना दिसत नव्हती असे का? बर, याच मराठी माणसाच्या मराठी मतान्वर सत्ता प्राप्त केल्या नन्तर शिवसेनेने त्याच मराठी माणसाला वारयावर सोडले होते हे सत्य शिवसेना विसरली काय? तेव्हा लगेच आपण स्थानीक भुमीपुत्रान्च्या हक्का साठी असलेली संघटना आहोत हे विसरुन शिवसेनेची केन्द्रात सत्ता हस्तगत करण्याची महत्वकान्क्षा वाढीस लागून मराठी माणसाला तात्काळ विसरुन 'हिन्दुत्ववादाचा' उदो उदो करण्यास शिवसेनेने सुरवात केली. या दोन दगडावर कसरत करताना शिवसेना आपला मूळ उद्देशच ( भूमिपूत्रान्ची तारणहार) विसरलीच नाही तर तो बाजुलाच ठेवला. असे असताना जर सगळ्याच क्षेत्रात हतबल मराठी माणसाला जर आपली बाजू घेणारा कोणीतरी म. न. से च्या रुपात पर्याय निर्माण झाला आणि त्यानी त्याला त्या बद्दल भरभरुन प्रतिसाद दिला तर त्याल 'पाठीत खंजीर खुपसणे' म्हणून हीणवणार का? याचा अर्थ शिवसेना मराठि माणसाला आपल्या गोठ्यातील गाय समजते. हे अस समजण उचित आहे का ? कदापी नाही. शिवसेने बद्दर उरली सुरली आपुलकी आता संपुष्टात आली आहे. माझ्या पुरत म्हणायच झाल्यास एक मराठी माणुस म्हणून शिवसेनेने मला दुखवला आहे.

.... या पूढे काहीही झाल तरी शिवसेनेनेस माझ मत मी देणार नाही. आणि शिवसेनेने त्याची अपेक्षाही करु नये. अर्थात माझ्या एका मताने शिवसेनेस काही फ़रक पडणार नाही , पण अशी अनेक मतेच मग म. न. से. जीन्केल आणि तसे झाल्यास कोणिही 'आमच्या पाठीत खंजीर खुपसला' असा गळा काढु नये. मला एक प्रसन्ग आठवतो. सेनेच्या कारभारला वैतागुन एक प्रामणिक नेता शिवसेनेतुन बाहेर पडला तेव्हा, आपल्या लाडक्या 'उद्धट काकनी' 'आम्हाला, शिवसेनेला काही फ़रक पडत नाही' अस उद्धट स्टेटमेन्ट दिले. तेव्हा नाना पाटेकर म्हणाले होते. असच जर होत राहील तर मग एक दिवस बाळासाहेब मागे वळून पाहतील तेव्हा त्याना दिसेल कि ते एकटेच उरले आहेत. नानाच वाक्य एवढ्या लवकर खर होईल अस वाटल नव्हत. तेव्हा' 'आमच्या पाठीत खंजीर खुपसला' असा गळा काढणारयानी याचे भान ठेवा. मराठी माणसाला गृहीत धरुन चालण सोडा आता.