Followers

Sunday, January 1, 2017

कल्हई वाला

नविन वर्षात नविन संकल्प करावा म्हणतात. मी तसे काही संकल्प वगैरे करण्यावर विश्वास ठेवत नाही. पण गेली काही वर्षे माझं लिखाण पुर्ण बंद झाले आहे. २०११ नंतर ब्लॉग पण लिहिला नाहिये. हे कुठे  तरी टोचतय. इथे सर्व कामे आटपून थोडा वेळ मिळतोय त्याचा सदूपयोग  या वर्षात करावा असा विचार करतोय. तेव्हा शुभस्य शिघ्रम म्हणत आज एक सुरवात तर करून पाहू.........

कल्हई वाला

"कल्हईईई...SSS" अशी कोल्हेकूई सारखी आरोळी वाडीत घुमली की आम्ही मुले हातात असेल तो खेळ सोडून आरोळी च्या दिशेने धूम ठोकत असू. कार्टून म्हणजे काय , टिव्ही चा  शनिवार , रवीवार  चे चित्रपट, छायागीत, चित्रहार आणि आमचं लहान मुलान्च हक्काच "किलबिल" सोडलं तर काहीच उपयोग नसलेल्या आणि खेळाच्या भाउ गर्दी च्या त्या काळात  ठिगळ लावलेलं पण पान्ढरा शुभ्र सदरा, तसेच धोतर, पान्ढर्‍या शुभ्र मिश्या, आणि उन्हातान्हात फ़िरून रापलेला काळा ठिक्कर सुरकुत्या असलेला चेहरा असा   कल्हई वाला हा आमच्या साठी एक "सुपरहीरो" असायचा. माझ्या साठी तो एका महान शास्त्रज्ञा पेक्षा कमी नसायचा.  कमरेची खाली सरकणारी चड्डी दोन बोटाच्या चिमटीत पकडून ओढत सुस्साट धावत जेव्हा मुलं त्या कल्हई वाल्याच्या भोवती गोळा होत तशी त्या कल्हईवाल्यात जोम येई..   इथपर्यन्त कोणीतरी त्याला आपलं एकाध पितळी भान्ड त्या कल्हईवाल्याजवळ कल्हई करण्यासाठी दिलेलं असायच. आपल्या कल्हई केल्या सारख्या शूभ्र झूपकेदार मिशान्वर हात फ़िरवत आणि एकवार सभोवार जमलेल्या दर्शकगणाकडे म्हणजे आमच्या घोळक्या कडे नजर फ़िरवून कल्हईवाला आपलं काम अश्या अविर्भावात सूरू करे की जणू आम्ही त्याच्या खिजगीणतीतच नाही.

आपली खान्द्याला लटकवलेली झोळी खाली ठेवून त्यातून तो एक एक अवजार अगदी काळजीपूर्वक काढून ठेवत असे.  आपण बसलेल्या ठिकाणा समोरच एक छोटा खड्डा तो खणत असे आणि त्यात तो त्याच ते आग ओकणारं अवजार पूरत असे आणि ते फ़रफ़रत पेटू लागे. त्याच्या ठिणग्या उडत. कल्हईवाला मग एक एक भान्ड हातात घेत असे , निरखून त्याला त्या आगीत धरे. त्या चमत्कारी अवजाराचं आम्हाला खूप अप्रूप वाटे. आई कितिही वेळ स्टोव्ह वर भान्डे ठेवत असे पण ते भान्ड कधीच लालबुन्द होत नसे. पण कल्हईवाल्याच्या त्या अवजारा समोर भान्ड धरले की काही क्षणात ते भान्डं लालबून्द होत असे. आमच्या बाल मनाला तो एक चमत्कार वाटे. आम्ही एक मेकाच्य चेहर्‍या कडे पहात असू.  लालबून्द झालेल्या त्या भान्ड्यात कल्हईवाला काहीसं टेकवे ते लगेच वितळून त्याचे आळूच्या पानावर जसे पाण्याचे थेम्ब असतात तसे थेम्ब तयार होत. ते तसे झाले की त्यचे डोळे त्य थेम्बा सारखेच चमकत मग त्याची हालचालीला गती येई. तो आपल्या पोतडीतून कापसा सारखा पुन्जका काढे आणि त्याने ते चमकदार थेम्ब त्या भान्ड्याच्या आत पसरवत असे आणि खुप वेळ ते फ़िरवे. क्षणात ते भान्ड चमकू लागे अगदी नव्या सारखं. आम्हा लहान मुलाना याची देही याची डोळा एक चमत्कार पाहिल्या सारखे वाटे.

एका पाठोपाठ एक अशी पितळी भान्डी कल्हई वाला  चमकवत जाई. आम्ही मुलं भारावून हे सगळं पहात असू. मग भान्ड्यान्चा मालक त्याला त्याचा मोबदला देत असे. हातात टेकवलेल्या त्या मोबदल्या कडे हताश पणे पहात तो ते डोक्याशी नेवून मग कमरेच्या बटव्यात  ठेवत मालका ने दिलेलं पाणी घटाघटा घशात रिकामं करे. त्याची ते हताश पहाणं काळजात कुठे तरी चिरत जाई.  एव्हाना त्याचं ते आग ओकणारं अवजार थंड झालेलं असे. त्याला तो खड्ड्यातून उपसून काढून आपल्या झोळीत व्यवस्थीत ठेवत असे. आपला पसारा आवरून खड्डा बूजवून कल्हईवाला त्याची झोळी खान्द्याला लटकावत असे आणि आपल्या वृद्ध गुढग्याबर भार देत तो उठत असे आपल्या पुढील पाडावा कडे जाण्या साठी.  डोम्बार्‍याचा खेळ संपल्यावर होते तशी दर्शकान्ची पान्गापान्ग होई..

"कल्हईई" अशी आरोळी ठोकत जाणारा तो पाठमोरा कल्हई वाला चालत चालत आजकाल कुठे तरी निघूनगेला आहे. पीतळी भान्ड्या  बरोबरच तो अडगळीत गेला आहे. पण जाताजाता आमच बालपणिच भावविश्व अनेक आठवणी आणि संमिस्र भावनानी भरून गेला आहे.  आज इथे चेन्नै मधे भर दुपारी जेवणा नंतर जरा वामकुक्षी घेण्याच्या विचारात असताना तीच आरोळी ऐकल्याचा भास झाला आणि मी बाल्कनी कडे धावलो. काळाच्या ओघात हरवलेला कल्हैइवाला पुन्हा दिसेल असं वाटलं , पण नाही, इथल्या भाषेत तसच  काहीतरी ओरडत जाणारा तो कोणी भलताच फ़ेरिवाला होता. आमचा "सुपरहीरो" खरोखरच काळाच्या ओघात कुठेतरी लुप्त झाला आहे.

Thursday, November 26, 2009

चला आपणही अतिरेकी बनूया......


सकाळी सकाळी मला मित्राने वर्तमान पत्र डोळ्यासमोर फ़डकवत २६/११ च्या श्रद्धांजली आणि त्याच्या होणार्‍या ग्लेमरयजेशन बद्द्ल माझा "व्ह्यू" विचारला आणि सकाळी सकाळी मस्तकात तिडिक गेली. पण सकाळ ची प्रसन्नता ढळू द्यायची नाही असा निग्रह करून मी शक्य तेवढे डोके शांत ठेवत त्याला निरुत्तर केलं.

काय कप्पाळ "व्ह्यू" देणार ? ज्या देशात जनतेच्या मताला किम्मतच नाही, ज्या देशातील जनतेला आपल्या हक्कांची पायमल्ली केली जातेय, आपल्या जगण्याच्या आधिकारावर सरळ सरळ घाला घातला जातोय याची जाणिव नाही, ज्या देशातील जनता स्वत: च्या अस्तित्वावर झालेल्या हल्ल्या चा निषेध स्वत: पेटून उठून रस्त्यावर उतरुन, राजकारण्याना चाबकाने फ़ोडण्या ऐवजी, मेणबत्त्या पेटवून "दिखाऊ चमकोगीरि आणि फ़ालतूगीरी" करणार्‍या तेवढ्याच "फ़ालतू" भारतीय जनतेला कशावर "व्ह्यू" देण्याचा आधिकारच नाहिये. त्यानी सकाळी उठाव, आज बॉम्ब हल्ल्यात किती मेले ? आपण परत सुरक्षित घरी येऊ ना? अशी काळजी करत घर सोडावं, निमुट कार्यालयात काम करावं, संध्याकाळी जर (ट्रेन मधे बॉम्ब ब्लास्ट झाला नाही तर धक्के खात) घरी परतावं, आणि कुटुंब कबिल्या बरोबर "आज चा दिवस सरला, आज जगलो, आज वाचलो" अशी धन्यता मानत झोपी जावं. वर तोन्डी लावायला महात्म्याच (?) तत्वज्ञान "अन्याय करणार्‍या पेक्षा अन्याय सहन करणारा अधिक दोषी असतो." असं बोम्बलत फ़िराव. विनाकारण "व्ह्यू" कशाला द्यावेत?

२६/११ नंतर गेट-वे जवळ जी मेणबत्त्यान्ची ड्रमेबाजी झाली त्यातील एकाही "चमकोला" पुढिल ३६५ दिवसात असा प्रश्न पडला नाही कि "पुढे काय?". अतिरेक्याना शब्दश: "पोसणार्‍या" सरकारला त्या दिवशी जमलेल्या विशाल जनसमूहाने एकदाही धारेवर धरलं नाही कि जाब विचारला नाही.

मेणबत्त्या लावून जर दहशतवाद संपला असता आणि मृतात्माना शांती लाभली असती तर हे जग अजूनपर्यन्त नंदनवन झाले असते. २६/११ च्या कसयाला गेट-वे जवळ ज्या दिवशी जाहीर फ़ाशी दिली जाईल तेव्हाच २६/११ च्या मृतान्च्या आत्म्यास शान्ती मिळेल. पण प.पु. बापुन्च्या देशात या जन्मात तरी असे होईल असे वाटत नाही.
उलट त्या अतिरेक्याचे "आज चीकन बिर्याणी" "उद्या तंगडी कबाब" असे 'बालहट्ट' आमचं सरकार ज्या तत्परतेने पुरविते आहे ते पाहून आमच्या जीभेची चव जातेय.

बेछूट गोळीबार करून निरपराध लोकान्चा जीव घेणार्‍या अतिरेक्यावर आमचं श्रीमंत सरकार दिवसाला ८५ हजार रुपये खर्च करते ते पाहून कधी कधी असे वाटते की सरकार तरुणाना "अतिरेकी बना" असा एक छुपा संदेश देत आहे. या देशात सामान्य माणसाला जगण दुरापास्त आहे पण अतिरेक्याना मान पान आहे. तेव्हा तरुणानो सरकारच्या भावना समजून घेऊया... सरकारच्या इच्छेचा आदर राखुया ..... चला आपणही अतिरेकी बनूया......

मुम्बई स्पिरिट


३१ करोड रुपये..., ३६५ दिवसात , दळभद्री, नपुंसक, निष्क्रिय, भारत सरकारने तुमच्या आमच्या कष्टाच्या कमाईवर "कर" या गोन्डस नावाने डल्ला मारुन जमा करुन, एका क्रुर, निर्दयी कसायावर खर्च केलेल्या पैशाचा हा आकडा आहे..... २६ नोव्हेम्बर २००८ च्या काळरात्रीला आज बरोबर एक वर्ष पुर्ण होत आहे. ते आले, त्यानी मृत्युचा नंगा नाच केला. आणि स्वत:सुद्धा मरून गेले. २६ नोव्हेम्बर ने अनेकाची आयुष्ये कायमची बदलून टाकली आहेत.

दहशतवाद 'मुम्बई स्पिरिट' ला धक्का लावू शकत नाही, असा कान्गावा जर कोण करत असेल तर तो पोकळ आहे. जखम जर भळ्भळती असेल तर ती लपवता येत नाही. दहशतवाद्यानी मुम्बई ला जबर जखमी केलय खर पण हे युद्ध मुम्बईकरानी केव्हाच मान्य केलय किम्बहूना ते त्याला तोन्ड द्यायला कंबर कसून तय्यार असतात. मग ते मार्च १९९३ असो, की ७/११.... ते हल्ला करतात आणि मुम्बईकर त्याना आपल्या कृती ने नेस्तनाबूत करतात.

...पण या वेळी मात्र हेच आमच "स्पिरिट" थोड ढासळतय. ...... नाही...दहशतवाद्याना आम्ही घाबरलो नाहिये ते अम्हाला घाबरवू शकत नाहीच मूळी. आम्ही घाबरलोय ते २६/११ नंतर जो सरकारी दहशतवाद सुरू आहे त्याला. गोळ्यान्चा वर्षाव अन्गावर झेलून ज्या अतिरेक्याला आमच्या बहादूर पोलिसानी पकडले ते काय त्याच्यावर ३५ करोड रुपये खर्च करण्या साठी? या ३५ करोड रुपया मधे किती पोलिसान्च्या वसाहती बान्धता आल्या असत्या? किन्वा किती पोलिसाना शस्त्र किन्वा संरक्षण कवच पुरवता आली असती ? ज्या अतिरेक्याने मृत्युचा नंगा नाच केला त्याच्यावर पैसा खर्च करणार्‍या सरकारच डोक ठिकाणावर नक्किच नाही.

आमचे "मुम्बई स्पिरिट" ढासळतय ते दहशदवाद्यान्च्या अतिरेकाने नाही तर ते या नपुंसक, निष्क्रिय सरकारच्या निष्क्रियतेच्या अतिरेकाने. मनात विचार येतो दहशतवादी कोण ? जे अचानक येऊन अंधाधुन्द गोळ्या चालवून क्षणात शेकडो लोकाना मारतात ते ? की आपल्या निष्क्रियतेच्या कळसाने लोकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण करून लोकाना क्षणोक्षणी मारतं ते सरकार? की मग.. चवताळून उठून सरकारला जाब विचारण्या ऐवजी मेणबत्त्या लावून "चमकोगिरि" करत निषेध व्यक्त करणारं ढोन्गी,वान्झोटं आणि मुर्दाड "मुम्बई स्पिरीट"

Saturday, November 7, 2009

बाळासाहेब, टक्कल अस्वलालापण पडतं म्हटल.


कालच बाळासाहेब म्हणाले, शिवसेना अस्वला सारखी आहे. काही केस गळून पडले तर शिवसेनेला फ़रक पडणार नाही. आता केस गळून पडलेले हे शिवसेना रुपी अस्वल नक्की कस दिसेल हा एक विचार मनाला चाटून गेला. आणि तेवढ्यात हे चित्र माझ्या डोळ्या समोर आले. या छायाचित्रा चा जो कोणी छायाचित्रकार असेल त्याच मी मना पासून आभारी आहे बुआ. मा. बाळासाहेबाना सत्याची जाणीव करुन देण्यास हे चित्र पुरेसे आहे...
बाळासाहेब
, खुप उशीर झाला आहे, पण.... अजुनही हातातुन वेळ मात्र गेलेली नाही. या अस्वलाच्या अंगावर पून्हा केस उगवलेले पाहण्यास आम्ही आतूर आहोत, तशी आमची मनोमन इच्छा सुद्धा आहे. तूटलेल मराठी मन, तुम्ही प्रयत्न केलात तर पून्हा एकसंघ होईल. तस होण गरजेच आहे. नाहीतर आपला लोण्याच्या गोळ्यावर ही माकडे ताव मारतील. आणि आपल्याच राज्यात आपण भुकेले राहू. महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले ही तर संत वाणी आहे. महाराष्ट्रातील मराठी हिन्दुना देशोधडीला लावून हिन्दुस्थानाच्या तमाम हिन्दुन्चे भले साधणार तरी कसे ?

..आणि त्यातुनही जरी हिन्दुत्वाच्या भल्या साठी एक वेळ आम्ही 'मराठी' चा मुद्दा बाजूला ठेवला तरी, जो इथल्या हिन्दून्च भलं नाही करु शकला तो हिन्दूस्थानातील तमाम हिन्दून्चे भले ते काय करणार. असा प्रश्न किन्वा शंका आमच्या मनात आल्यास ते गैर आहे काय? तेव्हा साहेब, आजूबाजू चे बडवे काय म्हणताहेत या पेक्षा तुम्ही काय म्हणाल त्याला मराठी माणूस किम्मत देतो हे विसरु नका. 'मराठी माणसाने पाठीत खंजीर खुपसला' अस विधान बाळासाहेब करुच शकत नाहीत, हा जो विश्वास तुमच्यावर आहे तसा विश्वास जनता कोणत्याही नेत्यावर दाखवत नाही. तुमच्या जवळ हा जनतेच्या विश्वासाचा खजीना आहे. त्याचा पुरेपूर वापर करा. या महाराष्ट्राचा , मराठीचा होणारा र्‍हास दूहीने थाम्बणार नाही. तेव्हा अजुनही तुटलेली मने सान्धण्याची. वेळ गेलेली नाहिये. ... या अस्वलाचे गेलेले केस फ़क्त तुम्हीच परत आणू शकता.... नाहीतर केसान्चे काय आहे....ते अस्वलाचे काय माणसाचे काय निगा नाही राखली तर ते जाणारच.....

Friday, November 6, 2009

पाठित खुपसलेल्या खंजीराची गोष्ट.

ज्या मराठी माणसाने शिवसेनेच्या पाठित खंजीर खुपसल्याची भाषा बाळासाहेब करत आहेत, त्या मराठी माणसाने तस का केल याच आत्मपरिक्षण करण्याचे कष्ट त्यानी घेतल्याचे दिसत नाहित. पराभव झाल्या बरोबर उलट-सुलट शब्दाचे वार मराठी माणसावर करण्याचे सत्र शिवसेनेने आरंभले आहे. (अर्थात, बाळासाहेबान्चा बोलविता धनी कोणी तरी दुसराच आहे हे १००% नक्की कारण बाळासाहेबानसारखा एक माच्युअर नेता आपल्या मायबाप मतदाराना उद्देशून असे बालीश विधान कधिहि करणार नाही हे त्रिवार सत्य आहे.) पण तस करताना त्यानी मराठी माणसाला काय आपल्या गोठ्यात बान्धलेली गाय समजले आहेत काय? किन्वा जेव्हा 'मराठी माणुस' ही आपली 'व्होट बान्क' मानून चाललेल्या शिवसेनेला आपली ही बान्क शाबुत ठेवण्या साठी काहीही प्रयत्न करावेशे वाटले नाहीत काय? कि शिवसेनेने मराठी माणसाला इतका गृहीत धरला काय कि त्याला स्वत:ची निवड करण्याचा अधिकारच नाही ? असे का? गेल्या १० वर्षात शिवसेनेने मराठी माणसासाठी अस काय भरीव काम केल की त्याची पोच-पावती म्हणून मराठी माणसाने त्याना मते द्यावीत ? गेल्या १० वर्षात मराठी माणसाची सर्वतोपरी पीछेहाट होत असताना शिवसेना काहीच करताना दिसत नव्हती असे का? बर, याच मराठी माणसाच्या मराठी मतान्वर सत्ता प्राप्त केल्या नन्तर शिवसेनेने त्याच मराठी माणसाला वारयावर सोडले होते हे सत्य शिवसेना विसरली काय? तेव्हा लगेच आपण स्थानीक भुमीपुत्रान्च्या हक्का साठी असलेली संघटना आहोत हे विसरुन शिवसेनेची केन्द्रात सत्ता हस्तगत करण्याची महत्वकान्क्षा वाढीस लागून मराठी माणसाला तात्काळ विसरुन 'हिन्दुत्ववादाचा' उदो उदो करण्यास शिवसेनेने सुरवात केली. या दोन दगडावर कसरत करताना शिवसेना आपला मूळ उद्देशच ( भूमिपूत्रान्ची तारणहार) विसरलीच नाही तर तो बाजुलाच ठेवला. असे असताना जर सगळ्याच क्षेत्रात हतबल मराठी माणसाला जर आपली बाजू घेणारा कोणीतरी म. न. से च्या रुपात पर्याय निर्माण झाला आणि त्यानी त्याला त्या बद्दल भरभरुन प्रतिसाद दिला तर त्याल 'पाठीत खंजीर खुपसणे' म्हणून हीणवणार का? याचा अर्थ शिवसेना मराठि माणसाला आपल्या गोठ्यातील गाय समजते. हे अस समजण उचित आहे का ? कदापी नाही. शिवसेने बद्दर उरली सुरली आपुलकी आता संपुष्टात आली आहे. माझ्या पुरत म्हणायच झाल्यास एक मराठी माणुस म्हणून शिवसेनेने मला दुखवला आहे.

.... या पूढे काहीही झाल तरी शिवसेनेनेस माझ मत मी देणार नाही. आणि शिवसेनेने त्याची अपेक्षाही करु नये. अर्थात माझ्या एका मताने शिवसेनेस काही फ़रक पडणार नाही , पण अशी अनेक मतेच मग म. न. से. जीन्केल आणि तसे झाल्यास कोणिही 'आमच्या पाठीत खंजीर खुपसला' असा गळा काढु नये. मला एक प्रसन्ग आठवतो. सेनेच्या कारभारला वैतागुन एक प्रामणिक नेता शिवसेनेतुन बाहेर पडला तेव्हा, आपल्या लाडक्या 'उद्धट काकनी' 'आम्हाला, शिवसेनेला काही फ़रक पडत नाही' अस उद्धट स्टेटमेन्ट दिले. तेव्हा नाना पाटेकर म्हणाले होते. असच जर होत राहील तर मग एक दिवस बाळासाहेब मागे वळून पाहतील तेव्हा त्याना दिसेल कि ते एकटेच उरले आहेत. नानाच वाक्य एवढ्या लवकर खर होईल अस वाटल नव्हत. तेव्हा' 'आमच्या पाठीत खंजीर खुपसला' असा गळा काढणारयानी याचे भान ठेवा. मराठी माणसाला गृहीत धरुन चालण सोडा आता.

Tuesday, September 30, 2008

अंधा कानून

या देशात ज्याला 'न्याय संस्था' किन्वा 'न्यायव्यवस्था' म्हणता येईल अस काहि अस्तित्वात आहे या गोष्टि वरिल विश्वास हळु हळु उडत चालला आहे. काहि खटल्यातील न्याय-निवाडे पाहिल्यास हा संशय द्विगुणित होतो. उदा. गोध्रा कान्ड निकालाचे अहवाल, दोन वेगवेगळ्या व्यक्तिनि दोन वेगवेगळे अहवाल सादर करणे आणि दोन्ही अहवालाचे निष्कर्ष वेग-वेगळे असणे हे म्हणजे अगदिच अतर्क्य आहे. विषेश म्हणजे एकच घटना 'कट' पण आणि 'अपघात' पण कस बुवा असु शकेल याच काहि अस्मादिकान्च्या 'बालबुद्धिला' आकलन होत नाहि. मान्य आहे आम्हि 'सामान्य नागरिक' आहोत. हेहि मान्य आहे कि आदरणिय न्यायालया विषयि मनात आतोनात आदर आहे. पण, लेकिन, किन्तू, परंतु..... हे अस कसं बुवा ? काहि कळत नाहि...

दूसर्‍या खटल्याच्या निकालात "सीमि" ला ज्या प्रकारे 'क्लिन-चिट' देण्यात आली ते पाहुन बसल्या जागी उडालोच. देशभर घडत असलेल्या घातपाती कारवायान्मधे सामिल असलेल्या अतिरेक्यान्चे धागेदोरे कुठे ना कुठे सिमी जवळ येवून मिळतात. ( दररोज वर्तमान पत्रातिल पोलिस तपासाच्या बातम्या तरी तेच सान्गतात.) असे असताना जेव्हा आमचे आदरणीय न्यायमंदिर "सिमीला दहशतवादी संघटना म्हणु नये. ती दहशतवादी संघटना नाही." अस जाहिर करुन तीला 'क्लिन-चिट' देउन मोकळी होते तेव्हा "एत तु ब्रुट्स?" एवढ्च तोन्डी येत.

मान्य बाबा, सिमि दहशतवादि नाहि, संत महत्म्यान्ची संघटना आहे. आता न्यायालयच म्हणते आहे तर पुढे काय? बोलणेच खुन्टले की. पण आम्हाला या धक्क्यातून सावरण्याचा अवधी तरी द्या की राव. त्या आधीच आमच्या आदरणिय उच्च न्यायमंदिर जाहिर करुन मोकळे कि "मराठि भाषे चा अट्टाहासा साठि रस्त्यावर उतरलेले तरुण दहशतवादि आहेत." आता बोला की राव. अहो दातखिळि बसेल नाहि तर काय?

प्रश्न आहे कायदयात नमुद केलेले असुन पण कायध्याचे पालन न करणारे लोक जे न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्यास गेले त्याना दहशतवादी का नाहि म्हणायचं ? ज्या सरकारी चाकरानी कायध्याचे काटेकोर पालन करणे टाळले आणि त्या तरुणाना आयतेच निमित्त दिले त्याना दहशतवादी का नाहि म्हणायचं? विशेष म्हणजे, 'सरकारने केलेला कायदा मोडण्या साठि खुशाल न्यायालयाचा दरवाजा ठोठावा' असा (छूपा) संदेश तर न्यायालयाला लोकान्पर्यंत पोहोचवायचा नाही ना? अशी एक आपली शंका मनात घर करतेय.

तर आजकाल हे सगळे निर्णय पाहुन मी अगदि निर्विकार होतो आहे. उद्या जर वर्तमान पत्रा मधे "सूर्य पश्चिमेलाच उगवतो : उच्च न्यायालय" अशी हेडलाईन आली तरीहि मी ती निर्विकारपणेच वाचेन आणि मला ते 'पटेल' सुद्धा, मग मनात कितीही 'पण.....लेकिन...किन्तू....परन्तू' उभे राहिले तरिही. कारण हे सगळ आपल्या 'सामान्य माणसाच्या' आकलना पलिकडच आहे.

Wednesday, April 2, 2008

सृष्टि चे गाणारे भाट


उन्हाळा सुरु झाला आहे. वातावरण तापते आहे. पण या 'घामाळ' उन्हाळ्यात जर काही आल्हाददायक गोष्ट असेल तर ती सकाळ. नुकताच मी कोकणातील माझ्या गावी जाऊन आलो. आणि येताना कान भरुन तेथिल पक्षान्ची सकाळी चालणारी 'किलबिल' घेऊन आलो. आज पहाटे पहाटे जाग आली आणि थोडावेळ माझा माझ्या कानावर विश्वास बसला नाही. आमच्या घरा समोरील आणि आजुबाजुच्या मोठ्या झाडान्मधे असंख्य पक्षी किलबिल करत होते. त्यात फ़क्त चिमण्याच नव्हत्या, कोकिळ पण अधुनमधुन आपला सुर मिसळुन नव्या ऋतु च्या आगमनाची दवंडी पिटत होते. आमच्या सोसायटिच्या बाजुच्या बंगल्याच्या आवारातिल झाडावर असंख्य चिमण्यान्चा चिवचिवाट चालण हे काही मला नविन नाही, पण आज त्या चिवचिवाटामधे काही नविन आवजाची साथ होती आणि ती एकुणच सगळि किलबिल एक नादमय मंजुळ संगीता सारखी भासत होती. हे सगळ सान्गण्यात विषेश अस की, मी ज्या नविन आवाजा विषयि मी सान्गतो आहे ते आवाज मी कोकणातील माझ्या गावी ऐकलेल्या पक्षान्च्या आवाजाशी मिळते जुळते होते. नवल हे कि ३० वर्षात मी पहिल्यान्दा हे आवाज आमच्या शहरात ऐकतो आहे.

परवाच 'रविवार चा लोकसत्ता' वाचायला हातात घेतो न घेतो तोच समोरच्या उम्बराच्या पानान्मधुन एक वेगळीच शिळ ऐकु आली. पेपर तसाच बाजुला ठेउन बाल्कनीत धावलो तर समोरच्याच फ़ान्दीवर एक चिन्टुकला काळा पक्षी आपली शुभ्र पान्ढरी छाती दिमाखात फ़ुगवुन शिळ घालताना दिसला. शेजारच्या फ़ान्दिवर विनाकारण इकडुन तिकडे उड्या मारणारा त्याच्या सारखाच पण आकाराने थोडा छोटा पक्षी म्हणजे मादी असावी असा अंदाज मी केला. त्याचे ते शिळ घालण आणि तीच अस ठुमकण म्हणजे एकंदरित 'लाईन मारो डॉट कॉम' सुरु होत हे समजण्यास फ़ार वेळ लागला नाही.
हे सारच माझ्यासाठी खुप विलक्षण आहे. कारण गेल्या ३० वर्षात मी पहिल्यान्दा हे सारं आमच्या शहरात अनुभवतो आहे. ट्रेक करत असताना किन्वा गावी रनावनातून तासनतास पक्षान्च्या मागावर फ़िरणे वेगळे आणि इथे बाल्कनीत बसल्या बसल्या असे दुर्मिळ पक्षी बागडताना पाहणे वेगळे.

ही गोष्ट शुभसुचक किन्वा कसे या बद्दल मी संभ्रमात आहे. कारण याची २ कारणे असु शकतात.

१. आमच्या शहरात पक्षान्साठि किन्वा 'स्थलान्तारित पक्षानसाठि पुरेसे सुरक्षित वातावरण किन्वा निवारा लाभतोय.

२. (देव करो नी हे कारण नसो) पक्षान्चे मुळ सुरक्षित निवारे नामषेश होत असवेत, आणि म्हणुन हे पक्षी नाईलाजास्तव शहराकडे फ़िरकत असवेत.

असो, जे असेल ते असेल, सध्या तरी 'आपल्या शहरात पण अशी किलबिल आपण ऐकु शकतो' हे स्वत:ला आणि भेटेल त्याला (वेड्या सारख) सान्गत सुटलोय... चला आता माझ्या सारख्या "सुर्यवन्शी" माणसाला ( म्हणजे सुर्याची किरणे डोक्यावर आल्याशिवाय न उठणारयाला :) ) लवकर उठण्यास भाग पडणार तर...